आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सौ. आशाबाई प्रकाश कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करणारा मानाचा पुरस्कार मानला जातो.
कदम घराण्याचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. आशाबाई प्रकाश कदम यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांसह समाजातही सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे.
या सन्मानाबद्दल राजनंदिनी एंटरप्रायझेसचे राहुल कदम यांनी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करत, “त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल यशासाठी सदिच्छा,” असे म्हटले आहे.
सौ. आशाबाई प्रकाश कदम यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. 💐🌟
– व्हॉईस ऑफ महाराष्ट्र न्यूज पोर्टल

✍🏻मुख्य संपादक – सोहेल शेख
















