पुणे | प्रतिनिधी
बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने दिनांक ०१ मे २०२६ रोजी पुण्यातील कोथरूड परिसरातील विविध बुद्ध विहारांमध्ये भक्तिमय आणि शांततामय वातावरण अनुभवायला मिळाले. या निमित्ताने अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी बुद्ध विहारांना भेट देत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले.





शांत, निर्मळ आणि सकारात्मक वातावरणात उपस्थितांना एक वेगळीच मानसिक प्रसन्नता अनुभवायला मिळाली. भगवान बुद्धांचा “अत दीप भव” — म्हणजे स्वतःच प्रकाश बना — हा प्रेरणादायी संदेश समाजाला नवी दिशा देणारा ठरला.
या प्रसंगी कोथरूड भीम उत्सव समितीचे मुख्य पदाधिकारी विजय बाप्पू डाकले, बाळासाहेब खंकाळ, दीपक कांबळे, अॅडव्होकेट मंदार जोशी, राहुल कदम तसेच दैवशाला गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, विजय गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
तसेच गौतम बुद्ध समितीचे ज्येष्ठ सल्लागार संदीपान पवळे, बन्सी गालफडे, राजरत्न बुद्ध विहाराचे कार्यकर्ते रोहित कसबे, पंचशील तरुण मंडळ भीमनगरचे अध्यक्ष अथर्व हुलावले, सागर थोरात, रोहन ओव्हाळ, शेखर शिंदे तसेच कार्यकर्ते संतोष बनसोडे, विजय भोसले आणि सोमनाथ गायकवाड यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रताप मस्के, नवनाथ सोनवणे, कचरू खळगे, बळीराम खळगे, महादेव खळगे तसेच मिलिंद संघाचे सामाजिक उद्योगपती समीर भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत मिलिंद संघाचे अध्यक्ष मिलिंद शेजवळ, राम खळगे, अमित, विकास कटारे, सूरज वाघमारे, अमीन शेख आणि वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमातून समाजात शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
व्हॉईस ऑफ महाराष्ट्र न्यूज
ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांची खास रिपोर्ट
#बुद्धपौर्णिमा२०२६ #अतदीपभव #कोथरूडभीमउत्सव #बुद्धविहार #पुणेन्यूज

✍🏻मुख्य संपादक – सोहेल शेख
























