समाजाच्या विकासासाठी मुस्लिम उमेदवारांचे संख्याबळ वाढणे गरजेचे
पुणे: प्रतिनिधी
येणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवारांना निवडून द्यावे
मुस्लिम उमेदवारां चे संख्याबळ वाढत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, समाजाच्या विकासासाठी जास्त जास्त मुस्लिम खासदार आणि मुस्लिम आमदार निवडून यायला पाहिजे असे मत हाजी जुबेर मेमन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजातील उमेदवार निवडून आले असून सर्व विजयी उमेदवारांचा पुण्यातील आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मेमन बोलत होते
या कार्यक्रमाचे संयोजन मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केले होते.
याप्रसंगी
कारी इद्रिस अन्सारी
कलाकार आसिफ अलबेला”मालेगाव”
कारी मुद्दसिर,अँड.सुलतान शहा,
कारी जमील, ईलहाजोद्दीन फारुखी,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष..,
कामील शेख”आदिल पब्लिकेशन,
फरीद खान पुणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स
इकबाल अन्सारी,मजहर शेख,
अक्रम मदारी आदी उपस्थित होते.
पुणे,नाशिक,सोलापूर,लातुर कोल्हापूर,मिरज,मुंबई,ठाणे, धाराशिव,अहील्या नगर,
रत्नागिरी,संभाजी नगर सह विविध भागातील नगरसेवक आणी पंचायत,जिल्हापरिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले तर आभार पुणे शहर महिला अध्यक्ष फरहीन सय्यद यांनी मानले.
फोटो ओळ:



✍🏻मुख्य संपादक – सोहेल शेख
























